Tuesday, June 23, 2020

बाल कविता

आश्चर्य 
                                                       
 

एकदा शहरात
सर्व प्राणी आले
सुनसान रस्ते
बघून चकित झाले

जंगलचा राजा 
पुढे आला
शांत वातावरण
पाहुन स्तब्ध झाला

उडत उडत
चिमणी आली
माणसांची गर्दी 
कुठे गेली ?

माणसांनी गजबजणारे रस्ते
सुनसान झालेच कसे?
हळूच लपत-छपत
म्हणाले दोन ससे

सर्व  प्राण्यांना गुढ उमगले
शांततेचे कारण समजले
कोरोना महामारीने
सर्वांना घरात डांबले.

No comments: