*"जगण्यावर
प्रेम करणाऱ्यांना आयुष्याविषयी कसल्याच तक्रारी नसतात..."*
🙎♂याचा
अनुभव आला तो whats up वर गेल्या दोन दिवसांपासून फिरणार्या एका पोस्टमुळे...निमित्त
होते एका पोस्टचे..हर्षल अंकुष पेंढारे हा मुलगा अमरावती पोलिस स्टेशनला सापडला होता
वतो पत्ता सांगत होता कोपरगाव येथील धारणगाव रोडचा.ती पोस्ट निरखून पाहिली आणि काळजात धस्स झालं.कारणही तसाचं होतं.
गेल्या दिड-दोन वर्षापूर्वीचा प्रसंग डोळ्यांसमोर
आला..आमच्या घरासमोरच एका बंगल्याचे बांधकाम सुरु झाले होते.व तेथे राखणीसाठी एक कुटुंब
बांधकामावर आले होते.कुटूंब तसं चौकोनी नवरा बायको व दोन मुले..त्या दोन मुलांपैकीच
एक होता हर्षल.मुलं दोन्हीही चाणाक्षव हुशार.आईवडील दोघेही दिवसभर बांधकामावर काम करायची
व मुले जवळच असलेल्या जि.प.शाळेत जायची.सकाळी व संध्याकाळी ही मुले खेळायला माझ्या
मुलांसगे यायची .मुलं गोंडस होती..सांगितलेले सर्व ऐकायची.
·
गेल्या दिवाळीचा प्रसंग.दिवाळी निमित्ताने
कोपरगावातील काही तरुणांनी छोट्या मुलांसाठी "किल्ले बनवा स्पर्धा" आयोजित
केली होती.त्यात माझ्या मुलांनी परस्पर नाव नोंदवून टाकले.व मुले लागली किल्ले बनविण्याच्या
कामालाइतर मुलांनीही किल्ले बनवायला थोडीफार मदत केली.पण राखणदाराच्या मुलांनी(हर्षल
व परशराम) यांनी दिवाळीच्या दिवशी अंगावर नवे कपडे असूनही माझ्या मुलांना खूप मदत केली.अक्षरशः
कपडे चिखलाने माखले तरी या लेकरांची मदत चालूच होती.शेवटी एकदा किल्ला पूर्ण होऊन परिक्षकांनी
परिक्षण केले.परिक्षणाला आलेल्या सर्व परिक्षकांना प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती आवडली.नेमकं
बक्षिस वितरणाच्या वेळी आम्ही सर्व कुटुंबासह निःशंक फेस्टीवल साठी जम्मू काश्मीर ला
होतो.त्यामुळे किल्ल्याच्या बक्षिस वितरणाला उपस्थित राहाता आले नाही.तिकडून आल्यावर
समजले की ज्या मुलांनी थोडीशी मदत केली होती तीमुले त्यांचे बक्षिसे घेऊन आली होती.घरची
दोन्हीही मुले हिरमुसली..किल्ले बनवा स्पर्धा आयोजकाला फोन लावला तर तुमचे बक्षिस काढून
ठेवले आहे.असे उत्तर मिळाले व विशेष असे की सायंकाळी आयोजकांची सर्व टिम बक्षिसे घेऊन
घरी आली.बक्षिस म्हणून शिवरायांची फोटो फ्रेम व प्रशस्तिपत्रकेही होती.ती बक्षिसे माझ्या
मुलांना देण्यासाठी टिमने पुढे बोलावले..त्यावेळेस मी त्यांना थोडे थांबण्यास सांगून हर्षल व त्याचा भाऊ परसराम
यास बोलवण्यास सांगितले.व ती मुलं आवाज दिल्याबरोबर धावतच आली..व तेव्हां उपस्थित सर्व
आयोजकांना माझ्या मुलांच्या बरोबरीने याही मुलांचा किल्ला बनविण्यासाठी सिंहाचा वाटा
असल्याचे सांगितले बक्षिस घेताना हर्षल,परसराम व माझी दोन मुले यांचा फोटो काढत असताना
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लाख मोलाचा वाटला.त्यानंतर माझ्या मुलांना सांगितले कि
*एकमेकांच्या सहकार्यानेच अशक्य गोष्टी शक्य होत असतात..त्यामुळे मदतीचा हात ज्यांनी
ज्यांनी दिला त्यांना कधीही विसरायचे नाही.*
यानंतर ही मुले माझ्या मुलांबरोबर चांगलीच मिसळत गेली.त्यानंतर बंगल्याचे
काम पूर्ण झाले व त्यांना दुसरीकडे मुक्काम हलवावा लागला.त्यात आम्ही आमचे सामान
न्यायला १५ दिवसांनी येऊ असे माझ्या मुलांना सांगून ती मुलं तिथून आईबरोबर गेली ती
परत आलीच नाही...माझी मुलं मात्र काळजीत पडली कि हरशा व परशा म्हणाले होते कि
आम्ही १५ दिवसांनी येऊ पण ती आलीच नाही.मीही मुलांची समजूत घालून ती गोष्ट कानाआड
केली.
त्यानंतर ही whats up वरील पोस्ट वाचून दिड दोन वर्षापूर्वीचा
प्रसंग डोळ्यांसमोर आला.हर्षल अमरावतीत कसा??याबाबत ज्या ग्रुपवर पोस्ट आली होती त्यांना
फोन केला.किशोर चोरगे यांनी त्या मुलाचे पालक सापडले तर आपण त्यांना मदत करू शकू असे
सांगितले..या नंतर मुलांना चैनच पडेना म्हणून त्यांनी त्यांच्या पप्पाला/माझे मिस्टर( श्री.सुर्यवंशी सर )यांना
हा प्रसंग सांगितला.तर त्यांनी लगेच हर्षल ज्या शाळेत होता त्या मुख्याध्यापक व शिक्षकांना
फोन करुन त्याची कौटुंबिक चौकशी व मुळगाव शोधले..ते श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंबचे
असून त्यांचे नातेवाईक कोपरगाव या ठीकाणी स्वामी समर्थ मंदिरापाठीमागे राहतात असे समजले.म्हणून
लगेच शाळेतील विद्यार्थ्याचे पालक सुनिलभाऊ यांना फोन लावून चौकशी करण्यास लावले..त्यांनीही
तत्परता दाखवत चौकशी केली पण हाथी यश आले नाही.म्हणून गळनिंबला आपले कोणी नातेवाईक
राहतात का??म्हणून नातेवाईकांत चौकशी केली.तेव्हा एका पाहुण्यांची सासुरवाडी गळनिंब ला होती त्यांच्या
कडून तेथील पाहुण्यांचा सरांनी फोन नंबर मिळवला व घडलेला प्रसंग सांगून हर्षल पेंढारे
च्या मामाला निरोप देण्यास सांगितला..त्यांनीही गावात शोध घेऊन त्याच्या मामाचे घर
शोधले.योगायोगाने हर्षलचे वडीलही तेथेच होते..आई व परसरामचा पत्ताच नव्हता(गायब होते.)त्यांना
हर्षल अमरावती याठिकाणी बालसुधारगृहात असून सुखरुप असल्याचे सांगितले.यानंतर दुसऱ्याच
दिवशी म्हणजे आज हर्षलचे वडील व शिंदे नावाचे गृहस्थ आमच्या घरी हजर झाले.व मुलाविषयी
चौकशी करु लागले..हर्षल सुखरुप असल्याने त्यांना लवकरात लवकर आवश्यक ती ओळखदाखल कागदपत्रे
घेऊन अमरावतीला जाण्याचे सांगितले...व त्यांना अमरावती बालरक्षक टिमचा फोन नंबरही दिला.
अमरावतीत राहणारे बालरक्षक श्री.विनोद राठोड सर व सर्व बालरक्षक टिम ने सुर्यवंशी सर
यांच्या एका फोनवरुन हर्षल कोणत्या पोलिस स्टेशनला आहे..याचा प्रखर उन्हात शोध घेतला
म्हणून आम्हालाही हे सर्व करणे शक्य झाले.याकामी ज्यांनी ज्यांनी आम्हाला फोनवरुन हर्षलच्या
कुटुंबाचा पत्ता शोधण्यास मदत केली त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत...
*आता जेव्हा हर्षल त्याच्या वडिलांना भेटेन तो क्षण आमच्यासाठी
सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल.पण एक आहे या निमित्ताने समाजातील एक विदारक वास्तव समोर
आलं ते म्हणजे गरीबीचं वास्तव.गरीबीपुढे माणसाला एवढे हतबल व्हावे लागते समाजातील एक
भीषणता यानिमित्ताने पुन्हा समोर आली..श्रीमंतीच्या गरजा अमर्याद व गरीबीच्या गरजा
मर्यादीत असतात..साधे रोजचे पोटभर अन्न मिळाले तरी गरीबाला श्रीमंत झाल्यासारखे वाटते.मग एक प्रश्न पडतो खरा श्रीमंत
कोण??ते की आपण..पण समाजात एवढीही भिषणता असूच नये..कारण हर्षल व परसराम यांच जगणं
मी जवळून पाहिलयं यांनी शिकून खूप मोठं व्हावं हिच सदिच्छा!! व परत आयुष्यात असा प्रसंग
कोणावरही येऊ नाही असे मनापासून वाटते...*
शब्दांकन -सौ.सुनिता नवनाथ सुर्यवंशी
न.पा.शाळा नं 3 कोपरगाव .
बालरक्षक -श्री.सुर्यवंशी नवनाथ पांडुरंग
सौ.सुनिता सुर्यवंशी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment